Thursday, December 8, 2016

शिवराई



शिवराई

             नाण्याच्या कडेनी बिंदुमय वर्तुळ (dotted border) असणार्या शिवराईला संग्राहक मुळ शिवराई म्हणुन ओळखतात. या शिवराईवर पुढिल बाजुनी तीन ओळीत- श्री/राजा /शिव आणि मागील बाजुनी- छत्र/पति असे दोन ओळीत लिहीलेले असते. बिंदुमय वर्तुळ असणार्या शिवराई सुबक  असुन पुढील व मागील बाजु व्यवस्थित जुळविलेल्या असतात,पण सद्ध्याच्या परिस्थितीत या शिवराई मिळवणं खुप कठिण झालेलं आहे. या शिवरायांचे वजन 11 ते 13 ग्रॅम्स मधे आढळते.या शिवराईला संग्राहक रायगड शिवराई म्हणजे रायगडच्या टांकसाळीतुन पाड्लेली शिवराई मानतात.

“रायगड शिवराई”

             शिवराई नेमक्या किती टांसाळीतुन पाडल्या जात होत्या हे अद्याप सांगता येत नसले तरी त्यांच्या अक्षरांच्या लिखाणाच्या विविधतेवरुन किमान त्या दहा ठिकाणच्या टांकसाळीतुन तयार झाल्या असाव्या किंवा याहिपेक्षा महाराजांच्या जास्त टांकसाळी असाव्यात. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यात टांकसाळ असण्याची शक्यता देखिल नाकारता येत नाही.
          छत्रपति शिवाजी महाराजांची कडेनी बिंदुमय वर्तुळ असलेली शिवराई जीला “रायगड शिवराई” म्हणून देखिल ओळखले जाते तिचे वजन 12.36 ग्रॅम च्या आसपास आहे तर अर्धी शिवराई 6.18 ग्रॅम च्या आसपास आहे. पुढे शिवराईचे वजन कमी होत गेले व शिवराई 11 ग्रॅम तर अर्धी शिवराई 5.5 ग्रॅम ची आहे. या शिवराईचा आकार 2 सें.मी आहे. यानंतरच्या शिवराया या 10 ग्रॅमच्या आसपास आहेत तर अर्धी शिवराई 5 ग्रॅम ची आहे.
“अर्धी शिवराई”
तसेच काही 1.5, 2, 3, 4 ग्रॅम च्या शिवराया देखिल उपलब्ध आहेत त्यांना बहुदा “रुके” म्हणत असावेत.
“रुका ?”


“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……
                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com
photos from-p.g.bhargave

Tuesday, November 29, 2016

शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती..........

   शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती

 “छत्रपतिंची शिवराई” या ब्लॊग वरील ही पहीली पोस्ट आहे,यामध्ये आपण शिवछत्रपतिंच्या नाण्यांबद्द्ल प्राथमिक माहीती घेणार आहोत, हा माझा प्रयत्न तुम्हाला नक्किचं आवडेल ही आशा करतो.
       ६ जुन १६७४, जेष्ठ शुद्ध त्रियोदशी, शनिवार ये दिवशी शिवाजी महाराज “सिंहासनाधीश्वर” झाले. रायगडावर आनंदी-आनंद झाला होता,आज एक “मराठा राजा” सिंहासनाधीष्टीत नृपती झाला होता. सभासदाच्या तोंडून पडलेले ते उद्गार या सर्वाची साक्ष देउन जातात, सभासद म्हणतो “ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा येवढा मर्हाटा पातशाहा “छत्रपति” जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही” यांचे वरील वर्णन महाराजांच्या दैदिप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची यथोचित माहिती देते….
      या दिवशी राज्याभिषेक सोहळ्याला “हेन्री आक्झिंडेन” नावाचा इंग्रज अधिकारी देखिल उपस्थित होता,त्या दिवशी त्याने शिवाजी महाराजांना विविध २० मागन्या केल्या होत्या, त्यातील एक मागनी होती की “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”, त्या २० मागन्यांपैकी महाराजांनी १९ मागन्या मान्य करुन एक मागनी मात्र अमान्य केली ती म्हणजे “इंग्रजी चलन स्वराज्यात चालु द्यावं”,त्याला प्रतीउत्तर म्हणून महाराजांनी त्यांना सांगीतलं कि “इंग्रजी शिक्क्याचे रुपये वा पैसे वा मोरा या मुलुकात चालणार नाहीत !!!”……………..

इ.स.१६७४ पासुन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरु केलं असावं,ज्याला आपणं “शिवराई” म्हणतो तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे “होणं” देखिल सुरु केले,तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत   पाडलेली स्वतःची “नाणी” ही एक दुरगामी व क्रांतीकारी घटना होती. बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते.तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते.शिवाजी महाराजांना आपल्या हिंदु धर्माचा रास्त अभिमान होता असे यावरून दिसते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले.त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजुला तिन ओळीत “श्री राजा शिव” व दुसर्या बाजुस दोन ओळीत “छत्रपत्ती” असे लिहीलेले असे.
“शिवराई” नाण्यांबद्दल ची अशीच माहीती मी आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन,
पुढील पोस्ट लवकरचं……….

कसं वाटलं जरुर कळवा……
                             contact no- 8698825074
email- ashutoshp1010@gmail.com